Monday 23 September 2019

प्राध्यापकांनी समाजातील बदलत्या लोकसाहित्याचा शोध घ्यावाः डाॅ.शहाजी जाधव






  प्राध्यापकांनी समाजातील बदलत्या लोकसाहित्याचा शोध घ्यावा :डाॅ.शहाजी जाधव

  पाचगणी : समाजात काळानुरूप साहित्य,तंत्रज्ञान,सांस्कृतिक आदी क्षेत्रात बदल होत आहेत.लोकसाहित्यातही अनेक प्रकारचे नवीन संदर्भ पहावयास मिळतात.प्राध्यापक व संशोधकांनी समाजातील बदलत्या लोकसाहित्याचा शोध घ्यावा आणि ते साहित्य पुस्तकरूपाने वाचकांसमोर आणावे  ,असे मत हिंदी विभागाचे डाॅ.शहाजी जाधव यांनी व्यक्त केले.

       पाचगणी येथील मीनलबेन महेता काॅलेजमध्ये प्राध्यापक प्रबोधिनीच्या उद् घाटनप्रसंगी लोकसाहित्य का जनमानस पर प्रभाव या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.
    प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले , प्राध्यापक प्रबोधनीच्या माध्यमातून प्राध्यापकांनी नवनवीन विषय व संशोधन यावर प्रबोधन करावे.विविध विषयातील ज्ञान संपादनाच्या दृष्टीृने प्रबोधिनीतील व्याख्याने मार्गदर्शक ठरतात.प्रत्येकांनी आवडत्या विषयाची मांडणी करून  आपले ज्ञान सर्वांपर्यत पोहचवावे.

       प्रास्ताविक प्रा.संतोष निलाखे यांनी केले.आभार प्रा.सतिश कुदळे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक,विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment