पाचगणीः शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुखे यांनी सांगितलेले ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार हे
तत्वज्ञानच समाजपरिवर्तनासाठी प्रेरणादायी ठरीत आहे.तरूणांनी व्यसनाधिनता,चंगळवाद,भ्रष्टाचार या प्रवृत्ती दूर
करून सुसंस्काराची समाजात पेरणी करावी असे प्रतिपादन प्रसिध्द व्याख्याते डॉ.इंद्रजीत देशमुख यांनी व्यक्त
केले.
पाचगणी येथे श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी
साळुंखे व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंपताना " ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार जगण्याचा मूलमंत्र " या विषयावरील
व्याख्यान्यात डॉ.देशमुख बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रसिध्द साहित्यिक जगन्नाथ शिंदे गुरुजी
होते.व्याख्यानमालेचे उदघाटन नगराध्यक्षा लक्ष्मीताई क-हाडकर यांच्या हस्ते झाले.यावेळी प्र.प्राचार्य
डॉ.बी.एन.कोकरे,सामाजिक कार्यकर्ते विकासअण्णा शिंदे,माजी उपनगराध्यक्षा सौ.सुलभा लोखंडे, रोटरीचे अध्यक्ष
किरण पवार,समन्वयक डॉ.भाऊराव दांगट,सहसमन्वयक प्रा.माणिक वांगीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना जगन्नाथ शिंदे गुरुजी म्हणाले,पाचगणीने व्याख्यानमालेद्वारे ज्ञान संपादनाची
वैभवशाली परंपरा जपली आहे.महेता कॉलेजने शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिकदृष्टीने घडविलेले
समाजपरिवर्तन उल्लेखनीय आहे.
प्रास्ताविक प्र.प्राचार्य डॉ.बी.एन.कोकरे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय डॉ.मिलींद सुतार यांनी करून
दिला.सूत्रसंचालन सहसमन्वयक प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार समन्वयक डॉ.भाऊराव दांगट यांनी
मानले.यावेळी डॉ.इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते भाग्यवंत श्रोता कुपन काढून विजेत्यांना बक्षिसे देण्यात
आली.माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी यांचा सत्कार डॉ.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.व्याख्यानास
प्राध्यापक,प्रशासकीय सेवक,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment