Thursday, 12 December 2019

युवकांनी रोट्रॅक्ट क्लबच्यामाध्यमातून सामाजिक क्रांती घडवावीःसंतोष शिंदे

युवकांनी रोट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडवावीः संतोष शिंदे










 पाचगणीः रोट्रॅक्ट क्लब ही सामाजिक कार्य आणि सामाजिक जाणिवा निर्माण करणारी संघटना आहे.या संघटनेने वैयक्तिक जीवनात व समाजात परिवर्तन घडविले आहे.या क्लबच्या वृक्षारोपन,स्वच्छता,शिबीरे,जलसंधारण अशा विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होवून युवकांनी समाजात सामाजिक क्रांती घडवावी,असे मत सातारा रोटरी क्लबचे डीआरआर मा.संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
     श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये राष्टीृय सेवा योजना अंतर्गत रोट्रॅक्ट क्लब आयोजित "सामाजिक सेवा आणि व्यक्तीमत्व विकास " या विषयावरील उजळणी वर्गामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.यावेळी रोटरी क्लब आॅफ पाचगणीचे अध्यक्ष शाहाराम जवानमर्दि ,सचिव सुनील कांबळे,मा.प्राचार्य जयवंतराव चौधरी,जयवंत भिलारे,भारत पुरोहित,राजेंद्र भगत,अशोक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
     प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,सामाजिक क्रांती व परिवर्तनात युवकांचा सहभाग महत्वाचा ठरत असतो.रोट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून गावागावात सामाजिक कामांचे जाळे निर्माण करूयात.महाविद्यालय विद्यार्थ्यांवर सातत्याने सामाजिक कार्याचा संस्कार करीत वारसा जपत आले आहे.या चळवळीत सर्वांनी सहभागी होवून परिवर्तन घडविले पाहिजे.
     शाहाराम जवानमर्दि म्हणाले,सामाजिक कार्यात सहभागी होवून युवकांनी समाजउपयोगी उपक्रम राबवावेत.रोटरी क्लब सामाजिक कार्यात सर्वतोपरीने मदत व सहकार्य करेल.
     संतोष शिंदे यांनी विद्यार्थ्यांना वाचन, भाषण,लेखन,अभिनय,संभाषण आदीबाबत प्रशिक्षण दिले आणि सामाजिक कार्यासाठी आवश्यक कौशल्येही सांगितली.प्रास्ताविक मा.प्राचार्य जयवंतराव भिलारे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.अनंता कस्तुरे यांनी केले.आभार जयवंत भिलारे यांनी मानले.कार्यक्रमाचे संयोजन प्रा.जयंत शिंदे,प्रा.नरेंद्र फडतरे ,प्रा.सुनील नवघरे यांनी केले.

Tuesday, 26 November 2019

भारतीय संविधानाचा प्रत्येकांनी गौरव करावाः प्राचार्य डाॅ.अरूण गाडे

भारतीय संविधानाचा प्रत्येकांनी गौरव करावाः प्राचार्य डाॅ.अरूण गाडे







पाचगणीःभारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ असे संविधान आहे.महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या संविधानातून प्रत्येकाला शैक्षणिक,सामाजिक,राजकीय असे सर्व प्रकारचे हक्क व कर्तव्ये दिली आहेत त्यामुळेच सर्वसामान्यांना न्याय मिळतो आहे.अशा संविधानाचा प्रत्येकांनी गौरव करायला हवा असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांनी व्यक्त केले.
   पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात "भारतीय संविधान आणि आपली कर्तव्ये " या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी डाॅ बी.एम.कोकरे,स्टाफ सेक्रेटरी प्रा.जयंत शिंदे,सांस्कृतिक विभागप्रमुख डाॅ.शहाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्रारंभी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे व विद्यार्थ्यांच्या हस्ते भारतीय संविधान ग्रंथ आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.अनंता कस्तुरे यांनी केले.आभार प्रा.जयंत शिंदे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

Wednesday, 16 October 2019

NEWS : घरोघरी वाचन संस्कृती जपायला हवीःसुरेश देशपांडे



प्रमुख पाहुणे सुरेश देशपांडे मार्गदर्शन करताना



अध्यक्षीय भाषण प्राचार्य डाॅ.अरूण गाडे
पाहुण्यांचे स्वागत
प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांचे स्वागत
प्रास्ताविक - डाॅ.वामन सरगर
दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन
उपस्थित विद्यार्थी






घरोघरी वाचन संस्कृती जपायला हवीः सुरेश देशपांडे

पाचगणीः साहित्य हे समाजाला दिशा देण्याचे काम करते. साहित्य वाचनामुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास होतो.जीवनाला आकार देणारी वाचन संस्कृती घरोघरी जपायला हवी असे प्रतिपादन मराठी साहित्य परिषद डोंबवलीचे अध्यक्ष व प्रसिध्द साहित्यिक सुरेश देशपांडे यांनी व्यक्त केले.
     पाचगणी येथे श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये मराठी विभागाच्यावतीने  मराठी वाड्.मय मंडळ उद् घाटन व वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.यावेळी डाॅ.वामन सरगर व प्रा.माणिक वांगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,महाविद्यालयीन काळात युवकांनी वाचन,लेखन,भाषण व संभाषण या कलांचा विकास करायला हवा.वाचनामुळे व्यक्तिमत्व व अभिरूची समृध्द होते त्यामुळे तरूणांनी वाचन संस्कृती जपण्यासाठी पुढाकार घ्यावा.
        या कार्यक्रमात सुरेश देशपांडे यांनी जप्ती ही विनोदी कथा सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.प्रास्ताविक डाॅ.वामन सरगर यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार प्रा.नरेंद्र फडतरे यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Tuesday, 15 October 2019

NEWS : बदलत्या पर्यावणाचा वन्यजीवांना धोका : प्राचार्य डाॅ.अरूण गाडे




..


बदलत्या पर्यावरणाचा वन्यजीवांना धोका : प्राचार्य डाॅ.अरूण गाडे

प्राणीशास्र विभागाच्यावतीने वन्यजीव सप्ताह साजरा

 पाचगणीः बदलत्या पर्यावरणाचा वन्यजीवांना धोका पोहचत आहे यामुळे वन्यजीवांची संख्या कमी होत आहे.बदलत्या वातावरणाचा विचार करून युवकांनी व सामाजिक संस्थांनी वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करून तशी समाजात जनजागृती करावी,असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांनी केले.
     पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमधील प्राणीशास्र विभागाच्यावतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजीत भित्तिपत्रिका अनावरणप्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्राणीशास्र विभागप्रमुख प्रा.डाॅ.आर.एम.गणेशवाडे, डाॅ.गजानन सोनटक्के,डाॅ.बी.एन.कोकरे,डाॅ.मिलिंद सुतार,प्रा.सुनिल नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक प्रा.डाॅ.आर.एम.गणेशवाडे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.वर्षा घोरपडे यांनी केले.आभार प्रा.डाॅ.गजानन सोनटक्के यांनी मानले.संयोजन प्रा.स्मिता जगताप,प्रा.अश्विनी पवार,प्रा.शितल चव्हाण यांनी केले.कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.