Tuesday 26 November 2019

भारतीय संविधानाचा प्रत्येकांनी गौरव करावाः प्राचार्य डाॅ.अरूण गाडे

भारतीय संविधानाचा प्रत्येकांनी गौरव करावाः प्राचार्य डाॅ.अरूण गाडे







पाचगणीःभारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ असे संविधान आहे.महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या संविधानातून प्रत्येकाला शैक्षणिक,सामाजिक,राजकीय असे सर्व प्रकारचे हक्क व कर्तव्ये दिली आहेत त्यामुळेच सर्वसामान्यांना न्याय मिळतो आहे.अशा संविधानाचा प्रत्येकांनी गौरव करायला हवा असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांनी व्यक्त केले.
   पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात "भारतीय संविधान आणि आपली कर्तव्ये " या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी डाॅ बी.एम.कोकरे,स्टाफ सेक्रेटरी प्रा.जयंत शिंदे,सांस्कृतिक विभागप्रमुख डाॅ.शहाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्रारंभी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे व विद्यार्थ्यांच्या हस्ते भारतीय संविधान ग्रंथ आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक डाॅ.शहाजी जाधव यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.अनंता कस्तुरे यांनी केले.आभार प्रा.जयंत शिंदे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment