बदलत्या पर्यावरणाचा वन्यजीवांना धोका : प्राचार्य डाॅ.अरूण गाडे
प्राणीशास्र विभागाच्यावतीने वन्यजीव सप्ताह साजरा
पाचगणीः बदलत्या पर्यावरणाचा वन्यजीवांना धोका पोहचत आहे यामुळे वन्यजीवांची संख्या कमी होत आहे.बदलत्या वातावरणाचा विचार करून युवकांनी व सामाजिक संस्थांनी वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करून तशी समाजात जनजागृती करावी,असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांनी केले.
पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमधील प्राणीशास्र विभागाच्यावतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजीत भित्तिपत्रिका अनावरणप्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्राणीशास्र विभागप्रमुख प्रा.डाॅ.आर.एम.गणेशवाडे, डाॅ.गजानन सोनटक्के,डाॅ.बी.एन.कोकरे,डाॅ.मिलिंद सुतार,प्रा.सुनिल नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक प्रा.डाॅ.आर.एम.गणेशवाडे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.वर्षा घोरपडे यांनी केले.आभार प्रा.डाॅ.गजानन सोनटक्के यांनी मानले.संयोजन प्रा.स्मिता जगताप,प्रा.अश्विनी पवार,प्रा.शितल चव्हाण यांनी केले.कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment